विरुद्ध आहार - एक गंभीर बाब

आपल्या पूर्वजांचे आयुष्यमान हे १०० वर्ष होते. त्यांचे शरीर हे आपल्या मानाने बळकट व निरोगी होते व आपण हे काडीमोडी किंवा एरण्डाप्रमाणे आतून पोकळ असे शरीर व ५०-६० वर्षाचे आयुष्य घेऊन जगतो. यामागे मुख्य कारण हे आपल्या खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी होय.

विरुद्ध आहार - एक गंभीर बाब

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

मानवाच्या तिन मुलभूत गरजा सांगितल्या आहेत त्या म्हणजे अन्न, हवा आणि निवारा. यामध्ये अन्नाला अग्रक्रम देण्यात आला आहे. मूलभूत गरजांमध्येही मूलभूत गरज ही अन्न आहे. म्हणूनच आहाराशिवाय शरीररूपी गाडी चालू शकत नाही पण पेट्रोल ने गाडी फक्त चालते पण गाडी चालवणाऱ्याला गाडी चालवण्यासाठी अन्नच लागते. अन्नाची प्रशस्ती आयुर्वेदामध्ये खालील प्रमाणे सांगण्यात आली आहे. सृष्टीतील सर्व प्राणीमात्राचा प्राण म्हणजे होय. आणि त्यामुळेच सर्व प्राणीमात्रांची आहाराकडे प्रवृत्ती असते. शरीराचा वर्ण, प्रसन्नता, उत्तम स्वर, जीवन, प्रतिभा, सुख, संतोष, शरीराची पुष्ठी, बल, मेधा हे सर्व घटक आहारावरच अवलंबून असतात. 

आजपासून २-३ हजार वर्षापूर्वी अन्नाचे सर्वांगिक महत्त्व आपल्या पूर्वजांना कळाले होते पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अन्न हे फक्त मानवाच्या जीभेचे चोचले पुरवण्यापर्यंत मर्यादित झाले आहे. अविचारीपणाने खाल्ल्यामुळे मानवप्राणी हा बऱ्याचश्या रोगांना बळी पडत आहे. यामध्ये काही सदय परिणाम दाखविणारे रोग आहेत तर काही कालांतराने परिणाम दाखवणारे. पण आज आपणास फक्त सदय परिणामकारक गोष्टींची सवय पडल्यामुळे बऱ्याचश्या गोष्टी आपल्या ध्यानात पण येत नाहीत व त्या जेव्हा लक्षात येतात तेव्हा कृती करण्यासाठी उपकारक असावेळ ही नसतो.

आपल्या पूर्वजांचे आयुष्यमान हे १०० वर्ष होते. त्यांचे शरीर हे आपल्या मानाने बळकट व निरोगी होते व आपण हे काडीमोडी किंवा एरण्डाप्रमाणे आतून पोकळ असे शरीर व ५०-६० वर्षाचे आयुष्य घेऊन जगतो. यामागे मुख्य कारण हे आपल्या खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी होय. आयुर्वेदामध्ये याचे सार्थ वर्णन विरुद्धान्न' या शीर्षकाखाली सांगण्यात आले आहे. विरुद्धान्न म्हणजे विरुद्ध गुणात्मक आहार सेवन करणे होय. अन्नाला आरोग्य आणि रोग ह्या दोन्हीचे कारण मानलेले आहे. जेव्हा आहार हा विचारपूर्वक सेवन केला जातो. तेव्हा तो शरीराचे पोषण करतो व आरोग्य कायम ठेवतो व जेव्हा हाच आहार अविचारीपणाने सेवन केला जातो तेव्हा तो विषवत कार्य करतो. इथे विष म्हणालो की प्राणघातक गोष्टीच डोळ्यासमोर येतात पण हळूहळू मृत्युस कारण होणारे सुद्धा विष या व्याख्येत येते हे वाचकाने लक्षात घेतले पाहिजेत. आपण जे दैनंदिनच्या जीवनामध्ये आहारासंबंधी चुका करतो. त्यापैकी बहुतांश गोष्टी या कालांतराने शरीरावर परिणाम दाखवितात म्हणून त्या विशेषरूपाने सामान्य व्यक्तीच्या लक्षात येत नाहीत. पण आपले आरोग्य टिकवून ठेवायचे असेल तर तोंडावर ताबा हा असलाच पाहिजे, नाही का?

विरुद्धान्नाचे आयुर्वेदामध्ये सखोल असे अध्ययन केलेले आहे. जसे आधुनिक चिकित्साशास्त्रामध्ये आहाराविशेषतज्ञांचा समावेश झाला आहे व दिवसेंदिवस ते शास्त्र आयुर्वेदाच्या तत्त्वाचे अध्ययन करून त्यातील मौक्तिक घटकांचा आपल्यामध्ये समावेश करून घेत आहे. आयुर्वेदातील आहारासंबंधीत जे विवेचन आहे त्यापैकी बहुतांश हे आपल्या संस्कृतीमध्ये सामान्य आचरणामध्ये होते पण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरणा करता-करता त्यांच्या बाबींबरोबर वाईट गोष्टीही डोळे बंद करून आपण स्विकारल्या आहेत व त्याचे परिणामही भोगतो आहोत.

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक प्रांताच्या खाण्यापिण्याच्या सवयी, पदार्थ हे भिन्न आहेत व ते त्या लोकांसाठी साजेश्या सुद्धा आहेत. जसे उत्तर भारतीय लोक हे आपल्या खाण्यामध्ये मोहरीचे तेल वापरतात कारण येथील वातावरण हे शीत आहे व मोहरीचे तेल हे उष्ण गुणात्मक आहे. इथे वाचकांना ही शंका येऊ शकते की विरुद्धान्नाची चर्चा चालू आहे व वातावरण हे शीत आहे व तेल हे उष्ण गुणात्मक आहे तर हे विरुद्ध झालं का? नाही. शरीराला अपायकारक व उपकारक या गोष्टी लक्षात घेऊन विरुद्ध ठरवायचेआहे. कालविरुद्ध यामध्ये जसे हिवाळ्यामध्ये शीत पदार्थ हे विरुद्ध सांगण्यात आले आहे. तसेच उष्णकाळामध्ये (उन्हाळ्यात) उष्ण पदार्थ हे विरुद्ध सांगण्यात आले आहे.

जसे हिवाळ्यामध्ये - केळी, पेरू खाल्यामुळे सर्दी होते हे आपणास माहित आहे पण हे विरुद्ध कसे? हिवाळा ही शित गुणात्मक व केळी, पेरू हे ही शीत गुणात्मक तर मग हे विरुद्ध कसे? हे तर सम झाले. इथेही वरील उदाहरणातील स्पष्टीकरणच द्यावे लागेल. भूक नसताना, पचविण्याची शक्ती नसताना, अतिमात्रेमध्ये, आहार घेणे हेही विरूद्धानच झाले. जसे श्रीखंड, जामुन खाणे इ. काही अन्नपदार्थांवर तळणे, भाजणे, वाफेवर शिजवणे इ. संस्कार करून वापरणे हे शरीरामध्ये अहितकर गुण निर्माण करतात. जसे फोडणी दिलेले दही हे शरीरामध्ये अहितकर गुण निर्माण करतात. जसे फोडणी दिलेले दही हे विरूद्धान्न होय. कारण दही हे उष्णगुणात्मक असून त्यावर अग्निचा संस्कार करतो. तसेच पनीरबुर्जी हे ही विरूद्धान्न आहे.

मध आणि घृत सममात्रेत सेवन करणे म्हणजे मात्रा विरुद्ध होय. त्याप्रमाणे योग्य मात्रेपेक्षा अधिक आहार घेणे हे सुद्धा मात्रा विरुद्धच होय. शरीरास सात्म्य, अनुकूल असलेल्या आहाराच्या विरूद्ध आहार सेवन करणे म्हणजे सात्म्य विरुद्ध होय. ज्या व्यक्तीस मधुर, स्निग्ध असा आहार सात्म्य आहे. त्याने अचानक उष्ण, तीक्ष्ण वा मांसाहार, मद्यसेवन करणे म्हणजे सात्म्य विरुद्ध आहार होय. हा आहार व्याधी उत्पत्तीस कारणीभूत होऊ शकतो. त्यामुळे असात्म्यजन्य व्याधी सुद्धा उत्पन्न होतात.

दुध व मांसे एकत्रित सेवन करणे हे विरुद्ध होय. यापैकी दुध हे शीत आहे तर मांसे हे उष्ण आहेत. यामुळे कुष्ठ व्याधी होतो असा उल्लेख आलेला आहे. इथे कुष्ठ याचा ढोबळ अर्थन घेता सर्व चर्मविकार घ्यावा. अतिपरिश्रम, अतिमैथून, अतिव्यायाम करणाऱ्या व्यक्तींनी नित्कृष्ट दर्जाचा आहार सेवन करणे हे सुद्धा विरुद्धच आहे. म्हणजे वरील व्यक्तींनी पोषक धातुवर्धक असा आहार घ्यावयास हवा कारण शरीराची झालेली झीज भरून यावी. शिळे, दुषित, न शिजलेले, उघड्यावरचे अन्न सेवन करणे हे विरूद्धाहाराच्या संज्ञेतच बसते. जसे सदय स्थितीमध्ये रस्त्यावर मिळणारे भजी, वडापाव इ. पदार्थ. मनास अप्रिय असा आहार हा सुद्धा विरुद्ध म्हणून सांगितला आहे. सध्याचे मेस चे जवेण मनास अनुकूल नसतानाही वेळ व नाईलाजास्तव खाणे. मनास अप्रिय याचा अर्थ असा नाही की चमचमीत पदार्थ खात सुटणे. मलमूत्र त्यागाशिवाय, दंत धावन ह्या दिनचर्येमध्ये सांगितलेल्या क्रमाचे उल्लंघन करून आहार सेवन करणे हे क्रम विरुद्ध होय. जसे आधुनिक जीवनशैलीनुसार बेड टी घेणे.

आहार हा एकांतामध्ये बसून, मन लावून करण्यास सांगितला आहे. पण आजकालचे टि. व्ही. पुढे बसून, चालता-चालता जेवण करणे, गप्पा मारत जेवण करणे हे विधिविरुद्ध आहार सेवन होय. अशा प्रकारे वरील सर्व विरुद्ध आहाराचा विचार करून आहार सेवन केल्यास स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य टिकविण्यास आणखीनच मदत होईल व नव-नवीन होऊ पाहणाऱ्या आधुनिक युगाची देव असणाऱ्या व्याधींना आळा बसेल.