तुकोजी आंग्रे - सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वडील
१६४० मध्ये शहाजीराजे भोसले यांनी कोकण जिंकले व या मोहिमेत तुकोजी आंग्रे यांनी चौल येथील युद्धात मोठा पराक्रम गाजवला.

आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.
आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.
मराठ्यांच्या आरमारी इतिहासातील एक प्रसिद्ध घराणे म्हणजे आंग्रे घराणे. आंग्रे घराण्याचा उत्कर्ष सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात झाला असला तरी कान्होजी आंग्रे यांचे वंशज व त्यांचे पूर्वज यांनी स्वराज्यासाठी मोलाचे योगदान दिले होते.
या लेखात आपण सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वडील तुकोजी आंग्रे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. आंग्रे घराण्याचे मूळ आडनाव संकपाळ त्यामुळे तुकोजी हे त्याकाळी तुकोजी संकपाळ या नावाने सुद्धा ओळखले जात असत. आंग्रे हे आडनाव या घराण्यास त्यांच्या मूळ गावावरून मिळाले. तुकोजी यांच्या वडिलांचे नाव सेखोजी आंग्रे असे होते व सेखोजी आंग्रे हे सुद्धा पूर्वीपासून आरमारात मोठ्या पदावर होते.
आंग्रे घराण्याचे मूळ गाव आंगरवाडी हे असल्याने संकपाळ घराणे पुढील काळात आंगरे म्हणूनच ओळखले जाऊ लागले मात्र हे आंगरवाडी नक्की कुठे याबद्दल इतिहासात दोन वेगवेगळे संदर्भ आढळतात.
काही साधनांमध्ये आंगरवाडी हे गाव पुणे जिल्ह्यात असून पुणे शहराच्या पश्चिमेस तीन कोसांवर होते तर काही साधनांमध्ये आंगरवाडी हे गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे या गावाजवळ असलेले आंगरवाडी असे उल्लेख आढळतात.
रियासतकार सरदेसाई यांच्या मते आंगरे हे मूळचे हर्णे येथील आंगरवाडी मधील होते व याला आंगरे घराण्याच्या एका जुन्या शकावलीतून मिळतो.
आंगरे घराण्याचा इतिहास विजयनगर साम्राज्याच्या काळापर्यंत मागे जातो. त्याकाळी कोकणातील एका भागात आंगरे घराण्याचा दबदबा होता व ते स्वतंत्रपणे राज्य करीत होते. १३६६ साली विजयनगर साम्राज्याकडून माधव नामक एक मंत्री कोकण ताब्यात घेण्यासाठी आला त्यावेळी आंगरे घराण्यातील लोकांसोबत त्यांचे युद्ध झाले मात्र या युद्धात विजयनगरकर यशस्वी झाले.
१६४० मध्ये शहाजीराजे भोसले यांनी कोकण जिंकले व या मोहिमेत तुकोजी आंग्रे यांनी चौल येथील युद्धात मोठा पराक्रम गाजवला. १६५९ साली तुकोजी आंग्रे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत दाखल झाले.
तत्पूर्वी मराठ्यांच्या आरमाराची जबाबदारी भिवजी गुजर यांच्याकडे होती व तुकोजी आंगरे हे या आरमारावर दर्यावर्दी म्हणून कार्य करीत होते.
तुकोजी आंग्रे यांचे वाढते वर्चस्व पाहून सिद्दीने त्यांना शह देण्यासाठी कारंजा नामक किल्ला उभारला होता. यानंतर एक वर्षांनी तुकोजी आंग्रे यांचे वडील सेखोजी आंग्रे यांनी हर्णे येथील सुवर्णदुर्गाची तटबंदी केली होती.
१६६९ साली तुकोजी आंग्रे यांना पुत्ररत्न प्राप्त झाले व त्यांनी या पुत्राचे कान्होजी असे नामकरण केले. तुकोजी आंग्रे व समस्त आंग्रे घराणे हे कानिफनाथ यांचे भक्त होते त्यामुळे त्यांनी आपल्या पुत्राचे नाव कान्होजी असे ठेवले असे उल्लेख काही साधनांत आढळतात.
पुढील काळात कान्होजी आंग्रे यांनी आपल्या पराक्रमाने मराठ्यांच्या आरमाराच्या उत्कर्षात मोठी भर घातली व आपले वडील तुकोजी आंग्रे व पर्यायाने समस्त आंग्रे घराण्याचे नाव इतिहासात अजरामर केले.
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |