रायगड किल्ल्यावरील एक अज्ञात शिलालेख: इतिहास, रहस्य आणि संवर्धनाची गरज

रायगड किल्ल्यावर सद्यस्थितीस एकूण तीन लेख आहेत व यापैकी दोन शिवकालीन लेख हे सुस्थितीत असून तिसरा शिवपूर्वकालीन लेख आहे तो आता काळाच्या ओघात लोखंडाची झीज झाल्याने नष्ट झाला आहे.

रायगड किल्ल्यावरील एक अज्ञात शिलालेख: इतिहास, रहस्य आणि संवर्धनाची गरज
किल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख

रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक प्रमुख दुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला केवळ दुर्गमता आणि वास्तुशास्त्रासाठी नव्हे, तर त्यावरील ऐतिहासिक शिलालेखांसाठीही प्रसिद्ध आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही रायगड किल्ल्यावरील ज्ञात शिलालेखांची चर्चा करून एका अज्ञात शिलालेखाबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. हा शिलालेख काळाच्या ओघात लुप्त झाला असला तरी त्याचे महत्व शिवकालीन इतिहासाला नवे आयाम देतो. चला, या रहस्यमय वारशाच्या सफरीला सुरुवात करूया.

रायगड किल्ल्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी

रायगड किल्ला रायगड जिल्ह्यात महाडजवळ वसलेला आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर आहे. रायगड किल्ला इतिहास हा यादवकाळापासून आढळतो, काही काळ हा किल्ला विजयनगर राज्याच्या अखत्यारीत असल्याचे उल्लेखही आढळतात. विजयनगर नंतर बहामनी, निजामशाही आणि आदिलशाही सत्तांच्या अखत्यारीत रायगड किल्ला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणल्यावर थोड्याच काळात या किल्ल्यास स्वराज्याच्या राजधानीचा मान प्राप्त झाला आणि किल्ल्याचे महत्व सर्वोच्च स्तरावर प्रस्थापित झाले. १६७४ साली येथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्यामुळे हा किल्ला मराठा साम्राज्याच्या केंद्रबिंदू बनला.

रायगडावर असंख्य वास्तू आहेत, जसे जगदीश्वर मंदिर, समाधी स्थळ, राजसभा आणि बाजारपेठ. रायगड किल्ल्यावर अशा असंख्य वास्तू व वस्तू आजही आहेत ज्या आजही प्रकाशझोतात यायच्या आहेत व गेल्या काही वर्षांत रायगड किल्ल्यावर पुरातत्व खाते आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून जे संवर्धन व उत्खनन सुरु आहे त्यातून नवीन नवीन माहिती प्रकाशझोतात येत आहे. रायगडावरील अनेक ज्ञात अज्ञात ऐतिहासिक वास्तू व वस्तू प्रकाशझोतात याव्यात आणि त्यांचे संवर्धन व्हावे अशी तमाम शिवप्रेमींची इच्छा आहे आणि किल्ल्यावरील अशाच एका अप्रकाशित गोष्टीबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

रायगड किल्ल्यावरील ज्ञात शिलालेख

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर किल्ल्याच्या वैभवात भर घालणारे एकूण तीन ऐतिहासिक लेख विद्यमान आहेत. पहिला लेख म्हणजे जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर कोरलेला सेवेचे ठायी तत्पर, हिरोजी इंदुलकर हा मराठी शिलालेख, दुसरा लेख म्हणजे जगदीश्वर मंदिराच्या नंदीमंडपाच्या बाहेरील बाजूस डावीकडे कोरलेला प्रासादो जगदीश्वरो हा संस्कृत शिलालेख आणि तिसरा व फारसा प्रसिद्ध नसलेला लेख म्हणजे रायगड किल्ल्यावरील लोहस्तंभावर कोरला गेलेला एक यादवकालीन लेख ज्याचे वाचन गो.नि. दांडेकरांनी केले होते. या तीन लेखांमधील पहिले दोन शिलालेख हे शिवकालीन असून तिसरा स्तंभलेख हा शिवपूर्वकालीन आहे.

पहिला मराठी शिलालेख हिरोजी इंदुलकर यांच्याविषयी आहे, ज्यांनी किल्ल्याच्या बांधकामात महत्वपूर्ण भूमिका बजावली. हा शिलालेख शिवाजी महाराजांच्या सेवेतील निष्ठेचे प्रतीक आहे. दुसरा संस्कृत शिलालेख जगदीश्वर मंदिराच्या बांधकामाशी संबंधित आहे, ज्यात मंदिराच्या वैभवाचे वर्णन आहे. तिसरा यादवकालीन लोहस्तंभ लेख काळाच्या ओघात नष्ट झाला आहे, पण त्याचे वाचन इतिहासकारांनी केले होते. याशिवाय, काही संदर्भांनुसार रायगडावर फारसी शिलालेखही आहेत, जसे औरंगजेबाशी संबंधित एक शिलालेख जो कधी बसवला गेला नाही. हे शिलालेख रायगड किल्ला शिलालेख इतिहासाला समृद्ध करतात आणि पर्यटकांना आकर्षित करतात.

रायगड किल्ल्यावरील अज्ञात शिलालेख: एक रहस्य

रायगड किल्ल्यावर सद्यस्थितीस एकूण तीन लेख आहेत व यापैकी दोन शिवकालीन लेख हे सुस्थितीत असून तिसरा शिवपूर्वकालीन लेख आहे तो आता काळाच्या ओघात लोखंडाची झीज झाल्याने नष्ट झाला आहे तरी त्या लेखाचे पूर्वी वाचन करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र या तीन लेखांव्यतिरिक्त रायगड किल्ल्यावर आणखी एक लेख आहे जो सध्या तेथे पाहावयास मिळत नसला तरी फार पूर्वी म्हणजे अदमासे ९० वर्षांपूर्वी रायगडास भेट देणाऱ्या गोविंदराव फडके यांना आढळला होता.

गोविंदराव यांनी १९३० सालापूर्वी रायगड किल्ल्यास भेट दिली होती आणि त्यांनी यावेळी किल्ल्याचे जे चौफेर दर्शन घेतले होते त्यावेळी त्यांना एक शिलालेख दिसून आला होता. हा लेख संस्कृत भाषेतील होता की मराठी याचा उल्लेख त्यांनी केला नसला तरी त्याचे वाचन त्यांनी करण्याचा प्रयत्नही केला होता. हा अज्ञात शिलालेख रायगड किल्ल्यावरील प्रसिद्ध जगदीश्वर मंदिराच्या प्रांगणात कोरण्यात आला होता व काळाच्या ओघात त्यावरील अक्षरे नष्ट होण्याच्या मार्गावर होती.

या शिलालेखात पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील दिवाकर नामक एका सावकाराचा उल्लेख असून जगदीश्वर मंदिरासंबंधी उभारणीविषयी हा लेख होता आणि त्या लेखाचा काळ १६७३ असा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक १६७४ साली संपन्न झाला त्यामुळे या लेखाचा काळ हा राज्याभिषेकापूर्वी एक वर्षे असा निघतो. गोविंदराव यांनी या अस्पष्ट अशा लेखाचे वाचन केले व त्यांनी त्याकाळी या लेखाची माहिती इतिहास संशोधकांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली होती मात्र पुढील काळात या शिलालेखावर काय संशोधन झाले याची काहीच माहिती मिळत नाही.

हा शिलालेख जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दिशेला असल्याने त्याचा संबंध मंदिराच्या बांधकाम किंवा दानाशी असावा. जुन्नरचे दिवाकर सावकार हे शिवकाळातील एक महत्वपूर्ण व्यक्ती असू शकतात, ज्यांनी मंदिरासाठी योगदान दिले असावे. १६७३ हा काळ शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तयारीचा होता, त्यामुळे हा शिलालेख स्वराज्याच्या विकासाचे प्रतीक आहे. दुर्दैवाने, हा शिलालेख आता दिसत नाही, आणि त्याचे कारण नैसर्गिक झीज किंवा उपेक्षा असू शकते.

अज्ञात शिलालेखाचा शोध आणि संवर्धनाची गरज

जगदीश्वर मंदिरातील या अज्ञात शिलालेखाचा शोध घेण्यासाठी व जर तो लेख आढळल्यास त्याची माहिती व्यवस्थापनाला देण्याच्या हेतूने आम्ही गेल्या महिन्यात भेट दिली मात्र आम्हास तो शिलालेख दिसून आला नाही. ९० वर्षांपूर्वीच हा लेख अतिशय अस्पष्ट झाल्याचे गोविंदराव यांनी सांगितले होते त्यामुळे सद्यस्थितीस तर या लेखावरील अक्षरे पूर्णपणे दिसेनाशी झाली असण्याची शक्यता आहे तरी या लेखाच्या माध्यमातून आमची पुरातत्व खाते आणि रायगड विकास प्राधिकरण यांस विनंती आहे की त्यांनी पुन्हा एकदा या लेखाचा शोध घेण्याची मोहीम राबवून रायगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारा हा पुरावा प्रकाशझोतात आणावा.

रायगड किल्ला संवर्धनाच्या दृष्टिकोनातून, अलीकडील उत्खननात नवीन शोध लागले आहेत, ज्यामुळे नवीन माहिती समोर येत आहे.

वारसा जपण्याची जबाबदारी

रायगड किल्ला हा केवळ पर्यटन स्थळ नव्हे, तर इतिहासाचा जीवंत दस्तऐवज आहे. शिलालेखासारख्या गोष्टी त्याच्या रहस्यमयतेची भर घालतात. पुरातत्व विभागाने यावर संशोधन वाढवले तर महाराष्ट्राच्या इतिहासात नवे अध्याय जोडले जातील.