उत्तर कोकणातील शिलाहार राजवंश
राष्ट्र्कुट नृपती तृतीय गोविंदाने आपला सेनापती व मांडलिक कपर्दी शिलाहारास चालुक्यांविरूद्ध मोहिमेत साथ दिल्याबद्दल उत्तर कोकणाचे मांडलिक बनवले. हा कपर्दी म्हणजे उत्तर कोकण शिलाहार सत्तेचा पहिला राजा. या घराण्याने उत्तर कोकणावर तब्बल 350 वर्षे राज्य केले.

आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.
आपली तसेच आपल्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग तसेच ऑनलाईन स्टोअर तयार करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आम्हाला आजच 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करा.
उत्तर कोकणाचा इतिहास शिलाहारांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. उत्तर कोकणास किंवा राजधानी पुरीस त्याकाळी कपर्दीद्वीप किंवा कवडीद्वीप असेही म्हणत व राजधानी अर्थात पुरी (मुंबई) हीच होती. शिलाहारांची एकूण तीन घराणी होती एक म्हणजे आपले उत्तर कोकण शिलाहार (ठाणे, कुलाबा, मुंबई), दुसरे दक्षिण कोकण शिलाहार हे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये राज्य करीत होते आणि तिसरे घराणे कोल्हापूरचे शिलाहार. यांच्या घराण्याच्या उगमाची कथासुद्धा नागांचा कोकणाशी संदर्भ दाखवते. ही तिन्ही घराणी आपणास विद्याधर राजा जीमूतवाहनाचे वंशज म्हणवीत. या जीमूतवाहनाने एका नागाला वाचविण्याकरिता स्वत:चा देह एका शिलेवर बसून गरूडाला अर्पण केला होता; म्हणून या वंशाला शिलाहार (शिलेवरील गरूडाचा आहार) असे नाव पडले, ही आख्यायिका शिलाहारांच्या लेखात सापडते.
कपर्दीनंतर तिसर्या पिढीतल्या वप्पुसन्न राजाच्या (काळ. सु. 880-910) काळात राष्ट्रकूट सम्राट द्वितीय कृष्ण याने ठाणे जिल्ह्राचा उत्तर भाग मधुमती (मुहम्मद) या मुसलमान सामंताच्या ताब्यात दिला. तेथे त्याच्या तीन पिढ्या राज्य करीत होत्या. त्यांची राजधानी संयान (डहाणू तालुक्यातील संजान) येथे होती. ही दोन्ही घराणी राष्ट्रकूट सम्राटांचीच मांडलिक होती; पण त्यांच्यात वारंवार खटके उडत, असे दिसते. इ.स. 974 मध्ये झालेल्या राष्ट्रकुटांच्या पतनानंतर शिलाहार अपराजिताने त्यांचा उच्छेद करून त्यांचा प्रदेश खालसा केला. हे घराणे शेवटपर्यंत राष्ट्रकूट सम्राटांशी एकनिष्ठ राहिले. मात्र राष्ट्रकुटांच्या पतनानंतर अपराजिताने उत्तरकालीन चालुक्य सम्राट तैलपापुढे मान न वाकवता आपल्या स्वातंत्र्याच्या निदर्शक अशा "पश्चिमसमुद्राधिपति' आणि "मांडलिकत्रिनेत्र' अशा पदव्या धारण केल्या. पुणक (पुणे), संगमेश्वर व चिपळूण जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याची सीमा दक्षिण कोकणात व घाटावर नेली. त्याच्या ताम्रपटात त्याच्या राज्याच्या सीमा पुढीलप्रमाणे सांगितल्या आहेत : उत्तरेस लाट (दक्षिण व मध्य गुजरात), दक्षिणेस चंद्रपूर (गोव्यातील चांदोर), पश्चिमेस समुद्र व पूर्वेस यादव भिल्लमाच्या खानदेशातील राज्यापर्यंत. त्याने मावळच्या नृपती सिंधुराज याच्या छत्तीसगडातील स्वारीत आपला पुत्र पाठवून त्यास साहाय्य केले होते, असे पद्मगुप्ताच्या नवसाहसांकचरित काव्यावरून दिसते.
चालुक्यांना अपराजिताचे सामथ्र्य सहन होणे शक्य नव्हते. तैलपाचा पुत्र सत्याश्रय याने त्याच्या प्रदेशावर स्वारी करून अपराजित राजास त्याच्या पुरी राजधानीत कोंडले. "एका बाजूस सत्याश्रयाची सेना व दुसर्या बाजूस समुद्रातले बेट पुरी यांच्या कैचीत सापडल्यामुळे अपराजिताची अवस्था जिची दोन्ही टोके जळत आहेत, अशा काठीवरील किड्यासारखी झाली'. नंतर अपराजिताला चालुक्यांचे मांडलिकत्व स्वीकारावे लागले; या मानहानीनंतर अपराजित फार काळ जगू शकला नाही. अपराजिताच्या मागून त्याचा पुत्र द्वितीय वज्जड गादीवर आला. त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ अरिकेसरी उर्फ केशिदेव गादीवर आला. अरिकेसरीने चालुक्यांचे स्वामित्व मान्य केले पण ते भोजाला सहन न होऊन त्याने उत्तर कोकणावर स्वारी करून शिलाहार अरिकेसरी ऊर्फ केशिदेव याचा पराभव केला. अरिकेसरीनंतर त्याचे छित्तराज, नागार्जुन व मुम्मुणिराज असे तीन भाऊ एकामागून एक गादीवर आले.
छित्तराजाच्या कारकीर्दीत कदंब नृपती षष्ठदेव याने कवडीद्वीप जिंकले. तसेच कोल्हापूरच्या गोंक राजानेही अपराजितचा पराभव करून "कोकणाधिपति' अशी पदवी धारण केली. छित्तराजाने अंबरनाथ येथील शिवालय बांधण्यास प्रारंभ केला. ते मुम्मुणीने पूर्ण केले. तेथे त्याचा सन 1060 चा शिलालेख सापडला आहे. मुम्मुणीच्या कारकीर्दीत शिलाहार आणि कदंब यांचा वैवाहिक संबंध जुळून आला. मुम्मुणीने (सन 1045-70) कदंब द्वितीय षष्ठदेव याचे स्वागत करून त्याला आपली कन्या अर्पण केली. मुम्मुणीच्या नंतर गूहल्लाने उत्तर कोकणावर स्वारी केली. यात त्याला कोणा एक अरब मुस्लिम अधिपतीचे साहाय्य झालेले दिसते. त्याने देश उद्ध्वस्त करून कोकणातल्या जनतेचा छळ केला; पण पुढे नागार्जुनाचा मुलगा अनंतदेव याने यवन आक्रमकांना हाकलून लावले. अनंतदेव राजाचा ताम्रपट खारेपाटण येथे सापडला असून त्याने आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे महाप्रधान दुर्ग श्रेष्ठींचे पुत्र भवन श्रेष्ठी आणि त्यांचे भाऊ धर्मश्रेष्ठी यांच्या मालवाहू जहाजांस नागोठणे, चौल, ठाणे व सोपारा या बंदरामध्ये करमाफी दिल्याचा उल्लेख आहे. ही करमाफी फक्त त्यांनाच नव्हे तर त्यांचे पुत्र आणि नातू श्रेष्ठी पनम, श्रेष्ठी कुडकल, श्रेष्ठी मलय आणि इतर अनेक लोकांनासुद्धा लागू होती. अनंतपालाच्या कारकीर्दीच्या अखेरीस शिलाहारांचा परत गोव्याच्या कदंबाशी झगडा उत्पन्न झाला. या झगड्यात कदंब नृपती जयकेशी याने उत्तर कोकणावर स्वारी करून अनंतदेवास ठार मारले आणि उत्तर कोकण आपल्या ताब्यात घेतले.
अनंतदेवाचा मुलगा अपरादित्य यांच्या काळात मोठी दैन्यावस्था आली होती. कदंबाच्या स्वारीच्या वेळी आजूबाजूचे मांडलिक त्यास जाऊन मिळाले यामध्ये काही अरब मांडलिकांचासुद्धा समावेश होता. एका शिलालेखामध्ये त्याचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे "छित्तुक नामक असुराने कोकणावर स्वारी केली, त्यावेळी मांडलिक त्याला जाऊन मिळाले. धर्माचा नाश झाला, वृद्धांचा छळ झाला. प्रजाजन जिर्णशिर्णी झाले व राष्ट्राची कीर्ती धुळीला मिळाली. तथापि न डगमगता अपरादित्य घोड्यावर स्वार होऊन एकटा रणांगणात घुसला आणि आपल्या बाहुबलाच्या आणि तरवारीच्या योगे त्याने शत्रूचा नि:पात केला" अपरादित्य हा अतिशय पराक्रमी व न्यायी राजा होता. आणि सर्व कलांचा अधीपति होता. तो स्वत: लेखक असून त्याने याज्ञवल्क्य स्मृतीवर "अपारर्कटिका' नामक ग्रंथ लिहिला होता जो आजही काश्मिरमध्ये प्रमाण मानला जातो. अपरादित्याने आपले वकील तत्कालिन राजांच्या दरबारी नेमले होते. मंखाच्या श्रीकंठचरितामध्ये अपरादित्याने काश्मिरच्या जयसिंग दरबारी नेमलेल्या तेज:कंठ या दुताचा उल्लेख आहे. मंखाने आपले श्रीकंठचरित काव्य सादर केले. तेव्हा कुंकणाधिपती अपरादित्याचा दूत म्हणून तेज:कंठ हा उपस्थित होता. अपरादित्यानंतर त्याचे दोन पुत्र मल्लिकार्जुन व हरिपाल गादीवर आले. या काळात कुमारपाल चालुक्याची स्वारी कोकणावर झाली असल्याचे दिसून येते. यानंतर द्वितीय अपरादित्य, द्वितीय केशिदेवराय आणि शेवटी सोमेश्वर गादीवर आला. सोमे•ार हा उत्तर कोकण शाखेचा शेवटचा शिलाहार.
याच्या काळात देवगिरीच्या यादवांची सत्ता प्रबळ होत होती. यादव नृपती कृष्ण याने उत्तर कोकणावर स्वारी केली होती मात्र यादवांना फार काही फायदा झाला नसल्याचे दिसून येते. मात्र कृष्णाचा लहान भाऊ महादेव याने परत एकदा कोकण मोहीम उघडली आणि मोठ्या हत्तींच्या तांड्यासह कोकणावर हल्ला केला. प्रथम महादेवाने स्थानक म्हणजे ठाणे या राजधानीवर हल्ला केला येथे सोमेश्वराचा पराभव होऊ लागल्याचे दिसू लागताच त्याने समुद्रात स्थित असलेल्या पुरीचा म्हणजे मुंबईचा आसरा घेतला. जी शिलाहारांची पूर्वीची राजधानी होती मात्र तिची भौगोलिक रचना ही (द्वीपांची) बेटांची असल्याने शत्रूने हल्ला केल्यास निसटण्यासाठी मार्ग उपलब्ध होत नसत. कारण ती तीनही बाजूने समुद्राने वेष्टित होती तिला शिलाहारांनी दुसरी राजधानी बनवले होते. सोमेश्वराने पुरीचा आश्रय घेतल्यावर झालेल्या तुंबळ सागरी युद्धात सोमेश्वर जहाजासहीत बुडून मरण पावला व तब्बल चारशे वर्षे कोकणावर राज्य केलेले शिलाहार साम्राज्य नष्ट झाले. शिलाहारांनी कोकणाचा सर्वांगीण विकास केला. येथे सध्या दिसून येणारी अनेक मंदिरे ही शिलाहारकालिन आहेत. शिलाहारांनी बौद्ध, जैनांसहित सर्व पंथांना उदार आसरा दिला.
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |